Tuesday, 31 March 2020

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही.. : इनक्रेडीबल इंडिया ( अतुल्य भारत ) मन में हे विश्वास संहारक करोना रुग्ण


मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK



इनक्रेडीबल इंडिया
( अतुल्य भारत )
मन में हे विश्वास
संहारक करोना रुग्ण
'घटनाक्रम
) 29 जाने 20 मध्ये करोना चा  पहिला रुग्ण भारतात सापडला आणि मार्च नंतर रुग्णसंख्या वाढत गेली. आज ,सुमारे २५ दिवसांनंतर आपली रुग्णसंख्या पोहोचली आहे १००० पर्यंत जी सर्वार्थाने आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्रांपेक्षा  लोकसंख्या आणि रुग्णसंख्या याची सरासरी मांडली , तर तुलनेने कमी म्हणता येईल.
) १३० कोटी लोकसंख्या असलेले राष्ट्र लॉक डाऊन यशस्वीपणे राबवत आहे आणि १०० कोटी हून अधिक जनतेचा सकारात्मक  प्रतिसाद हे अभूतपूर्व उदाहरण आहे जेव्हा प्रगत राष्ट्रे या आपत्तीचे गांभिर्य जनतेच्या गळी उतरवण्यासाठी अजूनही प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.
) साधनसामुग्री तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत टाटा ,महिंद्रा, मारुती आदी वाहन उद्योगातील अग्रगण्य उद्योगसमुहांनी भरघोस आर्थिक मदत पुढे केली. त्या व्यतिरिक्त उत्पादन खर्च मर्यादित ठेवून माफक किमतीत  व्हेंटिलेटर उत्पादन पण सुरू केले आहे.
) सोशल डीस्टेन्ससिंग साठी प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर खडूने मार्किंग केलेलं दिसून येत आहे आणि लोक सुरक्षित अंतरावरून अत्यावश्यक सेवांचा लाभ घेत आहेत, हे विशेष आहे.

) सरकारने प्रथमच आश्वासीत केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, औषधे यांचा कुठेही तुडवडा नाही आणि लोकही शिस्तबद्ध पद्धतीने,सुरक्षित अंतर राखून ठराविक वेळेत खरेदी करीत आहेत. साठेबाजांवर कडक कारवाई केली जात आहे जेणेकरून या वस्तूंचा काळाबाजार होऊ नये.
) BSNL सारख्या संस्था अखंडितपणे दर्जेदार सेवा पुरवीत आहे जेणेकरून लोकांना लॉक डाऊन सुसह्य होईल आणि इंटरनेट सारख्या सुविधां द्वारे घरी बसून काम  (work from home) आवश्यक माहिती प्राप्त करता येईल.
) भारतीय शास्त्रज्ञ स्वस्त दरात रोग निदान करणारे किटस,लस विषाणू विघटित करणारे तंत्र विकसित करत आहेत ज्यामुळे या रोगावर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. जयपूरमध्ये डॉक्टरच्या टीमने प्रथमच अँटीमलेरीयल आणि अँटी एचआयव्ही ड्रग यांचा संयुक्त वापर करून करोना रुग्णांवरवर उपचार केला जो आता जागतिक पातळीवर केला जातो आहे
) IIT चे विद्यार्थी पण यात मागे नाहीत. ज्या कपड्यावर विषाणू फार काळ जिवंत राहू शकणार नाही असे अभिनव फॅब्रिक ते विकसित करत आहेत.
) या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य पातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवर देखील सर्व सीमा सुरक्षा यंत्रणेने बंद केल्या असून प्रत्येक गावात आता गावकऱ्यांकडून  स्वयंघोषित 'गावबंदी' पाळली जात आहे हे कौतुकास्पद !
१०) रेल्वेसेवा बंद झाल्यानंतर रेल्वेबोगीचे आय सी यु मध्ये रूपांतर करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी होतोय. भारतीय रेल्वेची व्याप्ती फार मोठी आहे त्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वैद्यकीय सेवा पुरवणे आता सहज शक्य आहे. करोनाबाधितांचे वर्गीकरण, निर्जंतुकिकरण आणि आवश्यक तेथे वैद्यकीयसेवा या द्वारे उपलब्ध होणार आहे.
११) पोलीस दल, होम गार्डस, डॉक्टर, मेडिकल हेल्थकेअर संस्था यांच्या कष्टाला मानाचा मुजरा ! स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबियांची काळजी हे दोन्ही पणाला लावून हे लोक देशसेवा करत आहेत.

१२) विविध सामाजिक संस्था, खाजगी कंपन्या, गृह निर्माण आस्थापना, स्वयंसेवी संस्था, सिने -नाट्य कलाकार आदी  मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी, औषधे , वैद्यकीय मदत इत्यादी उपलब्ध करून देत आहेत. लॉक डाऊन मध्ये कोणी उपाशीपोटी झोपणार नाही , याची काळजी घेत आहेत. हे फक्त माझ्या देशातच घडु शकते.
ही यादी कधी संपणारी आहे.
आता विनंती एकच
आपण कोरोना विषाणू वाढू देण्याच्या प्रमुख टप्प्यात आहोत आणि हा आठवडा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त एवढेच करा की घराबाहेर पडू नका आणि ही संसर्गाची साखळी खंडित करा. आपल्या जगण्याची किंमत ठरवा आणि तमाम यंत्रणेच्या कष्टाला फळ मिळेल याची जबाबदारी घ्या.  सरकारने केव्हाच आवश्यक पाऊले उचलली आहेत आता आपले सहकार्याचे एक पाऊल अपेक्षित आहे.
ही निर्णायक लढाई आपणच जिंकणार आहोत ....
ये मन मे है विश्वास !

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 10 December 2019

राज्य नाट्य स्पर्धेतून शोध गुणवान रंगकर्मींचा

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

राज्य नाट्य स्पर्धेतून शोध गुणवान रंगकर्मींचा


59वी राज्य नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक तरूण रंगकर्मी त्यात आपला अविष्कार सादर करत आहेत. विविध समकालीन प्रश्‍न, पारंपारिक प्रश्‍न यांचा वेध घेत आहेत. आणि आपलं म्हणणं जोरकसपणे मांडत आहेत. यात प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट अशी की नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक नाट्यसंस्था, कलावंत, नाटके सादर करत आहेत व आपल्या सादरीकरणाने अभिनयाने नवा विचार देण्यात यशस्वी होत आहेत.
आज सर्व ठिकाणी रंगभूमीच्या विकासाविषयी, अस्तित्वाविषयी परिसंवाद होत आहेत. विचारमंथन होत आहेत. परंतू गाव-खेड्यात सादर होणार्‍या लोककला, लोकनाट्य याबरोबरच आज तरूण पिढी नाटक या माध्यमाला आपलेसे करत आहे आणि योगदान देत आहे. समूहातून, एकत्रितपणातून कलेची व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेत आहेत. हे रंगभूमीला बळ देणारे आहे. महानगराबाहेर खर्‍या अर्थाने ‘नाटक’ ही कला जोमाने विकसित होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कलावंत, सिनेमा, मालिका, निर्मिती क्षेत्रात नाव कमवत आहेत. नाटककार, लेखक आपल्या लेखनातून नवे विश्व जगासमोर आण आहेत. रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी नाट्यस्पर्धा ही प्रयत्नांचा भाग आहे. त्यातून अनेक कलावंतांना व्यासपीठ मिळते आहे व आपल्यातील कलागुणांना दिशा मिळत आहे. स्पर्धेतील पहिल्या पाच नाटकांचे प्रयोग शासनामार्फत, तालुका पातळीवर केल्यास अनेक नवीन व धडपड करणार्‍या कलावंतांना बळ मिळेल व त्यांच्या नाट्यप्रवासाला पूरकही ठरेल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 30 August 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

लव्ह यू नाशिक... कारण


नाशिक शहराच्या विकासासाठी अनेक व्यक्ती सामाजिक संस्था हातभार लावत आहेत आणि त्यातूनच नाशिकचे नवे रूप समोर येत आहे. अगदी सामान्य माणूसही यासाठी योगदान देत आहे. याचं एक उदाहरण म्हणजे मायको सर्कल जवळील डिव्हायडरमधील झाडांना एक व्यक्ती नित्यनेमाने सामाजिक जाणिवेतून पाणी टाकतो. असेच उदाहरण इंदिरानगर परिसरातही आहे. हे शहर आपलं आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी सकारात्मक केले पाहिजे ही जाणीव या मागे आहे. कुठल्याही पुरस्काराची, सन्मानाची अपेक्षा या लोकांना नाही. अशी खूप माणसे नाशिकच्या सुंदरतेसाठी झटत आहेत. 
कचरा निर्मूलनासाठी, प्लास्टिक निर्मूलनासाठीही अनेक संस्था अग्रेसर आहेत व प्रामाणिकपणे काम करत आहेत. हे गाव आपलं आहे आणि त्या गावाचं गावपण जपणं आपले कर्तव्य आहे ही भावना प्रत्येकात रूजवणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन व पार्कींगसाठी शिस्तशीर राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाशिकसाठी आपण काही विधायक काम करू शकतो का? आणि त्याचा सर्वांनाच उपयोग होईल ही जाणीव निर्माण होण्यासाठीच ‘# लव्ह यू नाशिक’ हा कृतीशिल मंत्र ठरेल. यात आपण काही नाशिकसाठी सामाजिक जाणिवेतून काम केले असेल त्याचे छायाचित्र किंवा माहिती अपलोड करून ‘# लव्ह यू नाशिक’ ही संकल्पना असलेल्या फेसबुकवर पाठवावी व जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे. 

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 14 May 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाकडे एक पाऊल


नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महानगरपालिका आणि हेक्सी सायकल यांच्या वतीने सुरु
करण्यात आलेल्या सायकल शेअरींग उपक्रमासंर्गात 70 हजाराहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.
सायकल चालवणार्‍यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे, हे निश्‍चितच अभिनंदनीय आहे. पर्यावरण संवर्धन आणि
प्रदुषण रोखण्यासाठी प्रभावी चळवळ आहे, असे म्हणावयास हरकत नाही. आज बदलेली जीवनशैली तणावग्रस्त
जीवन धावपळ यावर उपाय म्हणजे सायकलींग करणे. जनमाणसांत लोकप्रिय होत आहे. हेक्सी अ‍ॅप च्या
माध्यमातून सायकल शेअरींग सेवेचा वेगाने प्रसार होत असून एक प्रकारे समाजात आरोग्याविषयी
जनजागृतीचाच भाग म्हणावा लागेल. तसेच इंधनाचे वाढलेले भाव आणि  त्यापासून वाढत चाललेले आरोग्याचे
प्रश्‍न. यामुळे सायकल चालवणे हा किफायतशीर मार्ग म्हणायला लागेल. काही शहरात नो व्हेईकल डे च्या
माध्यमातून इंधन बचतीचा व शुध्द हवेचा विचार पोहोचवण्यात यश येत आहे. आरोग्यविषयक जनजागृती
करणार्‍या संस्था सायकलींग करण्याचा संदेश देण्यासाठी जनचळवळ उभारत आहे आणि त्यात लोकसहभाग
वाढत आहे. पर्यावरण रक्षणासाठी सायकलिंगसारखे उपक्रम हे जीवन व्यवहाराशी निगडीत व्हावेत हीच अपेक्षा !


(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 15 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

पाणी बचतीसाठी जलसाक्षरता महत्त्वाची


दिवसेंदिवस पाण्याची समस्या तीव्र होत असून पाणी संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर नद्यांतील पाण्यात होणार्‍या प्रदुषणाचा धोका निर्माण होत आहे. नुकताच केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सर्व राज्यात जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वेक्षणात हे मुद्दे उपस्थित केले आहेत.
जनसामान्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणे ही जलनीतीची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि योग्य वापर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस बिघडणारा असमतोल आणि पाण्याचा गैरवापर, बेशिस्त वापर हे जलसंवर्धन करण्यातले महत्त्वाचे अडथळे आहेत. पाण्याचे नियोजन करतांना फायदेशीर बाबींचा योजनांचा विचार करणे महत्त्वाचे असते. रोजच्या व्यवहारात स्वयंपाक, आंघोळ, धुणीभांडी आदिंसाठी पाण्याची गरज आहे. पण वापरण्याच्या पद्धती कशा आहेत यांवर विचारमंथन व्हावे.
त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत जपावेत. यासाठी उद्योगांसाठी लागणारे पाणी, घराघरातून निघणारे सांडपाणी यांसदर्भात जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. पाणी हे जीवन आहे व पाणी वाचवणे ही भविष्याची बचत आहे हे सत्य आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजन, जलसंधारणाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब व लोकसहभाग वाढवणे म्हणजेच जलसाक्षरता निर्माण होईल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 9 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

मनावर आनंदाचे फुल फुलण्यासाठी...


राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांनी नुकतान एक अनोखा जनजागृतीचा उपक्रम जनतेसाठी राबविला आणि त्याला जनतेनेही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर या अभियानाचा विषय होता ‘मानसिक स्वास्थ्य’. मानसोपचार तज्ज्ञांनी खेडोपाड्यात जाऊन गावकर्‍यांशी चर्चा करुन या आजाराविषयी माहिती दिली. शास्त्रीय पद्धतीने निरसन केले. नैराश्य किंवा उदासीनता ही भावना पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर ती व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे, असे समजावे असे लक्षण सांगितले. याप्रकारचे पेशंट खेडोपाड्यात दिवसेंदिवस वाढत आहेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यासाठी हे अभियान सुरु असल्याचे गावकर्‍यांना सांगितले आणि अनेक शेतकर्‍यांनी आपली व्यथाच डॉक्टरांसमोर मांडली. त्यात सोशल मिडीया, कुटुंब पद्धतीतील वाद, शेतीव्यवसायाला आलेली अवकळा हे विषय त्यांनी मोकळेपणाने कथन केले.
‘गाव तेथे मानसोपचार’ ही संकल्पना घेऊन मानसिक आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. जीवनशैलीतील बदल, वाढती जीवघेणी स्पर्धा, विसंवाद यामुळे हे प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्यावर समुपदेशन होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. तरुण पिढीवर सोशल मिडीयाचे आक्रमण वाढत आहे आणि त्यातून त्यांचा जीवन व्यवहार ढासळत आहे. हा जसा महानगरातील प्रश्‍न आहे तोच प्रश्‍न खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. त्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवे.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur