मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
विना हेल्मेट प्रवास, मृत्यूला निमंत्रण
हेल्मेट वापरणे ही खरं तर मूलभूत गरज ठरली आहे. वाहतूक सुरक्षा ही स्व:सुरक्षेशी निगडीत गोष्ट आहे. याचा कोणी विचारच करत नाही. नुकत्याच पोलीस खात्याकडून आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यात सुमारे 28 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यात 25 लोकांनी हेल्मेट घातलेले नव्हते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि चारचाकी अपघातातील तिघांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता.
तसेच 18 ते 80 वयोगटातील तरूण हे हेल्मेटसक्ती असतांनाही विनाहेल्मेट वाहन चालवतांना जीव धोक्यात घालत आहेत.
नाशिक शहराचा वाढता विस्तार, वाढती वाहनांची संख्या अति वेग आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन ही काही कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
पोलीस विभागकडून वाहतूक नियमांविषयी प्रबोधनपर जनजागृती होऊनही अपघात रोखण्यास फार यश आले असे म्हणता येणार नाही. शालेय पातळी पासून ते महाविद्यालयीन पातळीपर्यंत अनेक प्रकारे जनप्रबोधनाची चळवळ अधिक वेगाने करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे आणि त्यात स्वयंशिस्त व सुरक्षा यांचा मेळ घालून संदेश देणे महत्त्वाचे ठरेल.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur