Friday, 5 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

लोकशाही सशक्त, सुदृढ करण्यासाठी 



मतदान करणे हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने बजावले पाहिजे यासाठी शासकीय पातळीवरून ते सामाजिक संस्थापर्यंत प्रयत्न होत आहेत. मतदानाचा हक्क लोकशाहीने बहाल केला आहे आणि त्याची जपवणूक केलीच पाहिजे. या जाणिवेतून नाशिक ‘सायकलिस्ट फाऊंडेशन’तर्फे मतदान जनजागृती करण्याचे अभिनव पाऊल उचलले आहे. गेटवे ऑफ इंडीया ते इंडिया गेट अर्थात मुंबई ते दिल्ली असा सायकलने प्रवास करत संदेश दिला जाणार आहे. हे अंतर अवघ्या 72 तासात हे सायकललिस्ट पार करणार असून इंडीया गेटवर गुढी उभारणार आहेत.
सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांना जाणून घेऊन ते सोडवणे ही सरकारची जबाबदारी असते. परंतू त्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यासाठी ही चळवळ उभारली आहे. लोकशाही मजबूत व भक्कम करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे असे आपण म्हणूया.
देशात तरूणांची संख्या जास्त आहे. त्यांनी मतदानाचा हक्क जबाबदारीने पेलल्यास लोकशाही सदृढ होण्यासाठीही आणि नव्या विचारांची पिढी देशाला प्रगती पथावर नेऊ शकेल. सकारात्मक वैचारीक आणि सर्वांच्या विकासासाठी झटणारा पारदर्शक, कार्यक्षम उमेदवार, लोकप्रतिनिधी निवडूण देण्यासाठी मतदानाची प्रक्रीया पार पाडणे महत्त्वाचे आहे. 

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment