Thursday, 17 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
नाशिक - नव्या विकास क्रांतीकडे

जागतिकीकरणाच्या प्रचंड मोठ्या रेट्यात नाशिकही नवा चेहरा घेऊन स्पर्धेचा जोरदार सामना करीत आहे. भारताबरोबरच एकूणच जगाच्या बदलत्या वेगवान प्रगतीचे संकेत नाशिक शहरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आर्थिक, सामाजिक, सहकार, सहकार बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातले नवे प्रयोगशील बदलही नाशिक शहराने स्वीकारलेले आहेत व ते मूर्तरूपात आज समोरही आले आहेत. एकंदर विविध क्षेत्रातली बदलांची नव्या युगाची नवी परिभाषा शहराने आत्मसात केली आहे. आव्हाने पेलण्याची नवी ताकद नाशिकने निर्माण केली आहे.
बांधकाम क्षेत्राचा विचार केला तर शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे निवार्‍याचे प्रश्‍न बिकट होत आहेत. आजही इथल्या नागरिकांची मानसिकता गावापासून दूर रहावयास जाण्याची नाही. त्यासाठी लहान कमी जागेत जास्तीत जास्त इमारतीचे बांधकाम करतील. त्यासाठी दहा मजल्यांपर्यंत इमारती बांधण्याचे आव्हान बिल्डर मंडळी स्वीकारतील व ते अपरिहार्य आहे. यामुळे भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता इमारतीच्या उंचीची मर्यादा महानगरपालिकेला वाढवावी लागेल. या सार्‍यांचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होईल त्यामुळे ट्रॅफिक जामसारख्या नैमित्तिक प्रश्‍नांमध्ये वाढच होईल. त्यासाठी त्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शासन व महानगरपालिकेची आहे. अर्थातच त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असेलच. 
नाशकात महत्वाच्या कंपन्यांच्या ब्रॅण्डचं आगमन वेगाने होत आहे. त्याच बरोबर आणखी काही आंतरराष्ट्रीय मॉल्सची साखळी नाशकात आली आहे. त्यामुळे नाशिक आर्थिक व यशस्वी उलाढाल देणारी नगरी ठरली आहे. 
अर्थव्यवहारातील मोठी उलाढाल आज नाशकात होत आहे. देश-विदेशातल्या खाजगी बँकांनी, कंपन्यांनी आपले बस्तान नाशकात यशस्वीरित्या बसविलेले आहे. याचेच पुढचे पाऊल इथल्या वेगवान आर्थिक उलाढालीचा अभ्यास करून अनेक जागतिक अर्थ कंपन्या स्थिरावलेल्या आहेत. 


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 15 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
औद्योगिक प्रदुषण व नाशिक

नाशिकच्या विकासात औद्योगिक वसाहतीचे मोठे योगदान आहे. अंबड व सातपूर परीसरात केमिकल्स आणि औषधी उत्पादनामुळे प्रदुषण होते. तसेच कोटिंग व प्लेटींग उद्योगाचेही वेगळेपण आहे. यातून रासायनिक प्रक्रीयेतून उत्पादन होत असते. याच उद्योगातून तयार होणारे  रासायनिक पाणी शुद्ध करण्यासाठी मेटल फिनिशर्स असोसिएशनकडून (कॉमन इन्फ्ल्युएन्स ट्रीटमेंट प्लान्ट) उभारला जाणार आहे. यासाठी एम.आय.डी.सी.ने अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध करून दिला आहे. 11 कोटींचा हा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धपाणी तयार करण्याची क्षमता असलेला हा महाराष्ट्रातील मोजक्या प्रकल्पातील एक प्रकल्प असणार आहे. एमआयडीसी बरोबरच उद्योजकांनी स्थापन केलेल्या पर्पज व्हेईकललाही स्वत:च्या वाट्याचा निधी उभा करावा लागेल. 
प्रदुषणमुक्त नाशिकसाठी असे प्रकल्प निश्‍चितच मोलाचे योगदान देतील व वाढत्या औद्योगिकीकरणाकडे वाटचाल करणार्‍या नाशिकला शुद्ध व सात्त्विक हवा मिळण्यासाठी मदत करतील.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 12 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
नाशिक स्वच्छतेसाठी तरूणांचा सहभाग

नाशिक शहराच्या विकासासाठी नागरीक सामाजिक संस्था आपल्या परीने हातभार लावत आहेत. त्यामध्ये तरूण पिढीचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे. नाशिकची स्वच्छता महत्त्वाचा विषय ठरत आहे. महावीर पॉलीटेक्निक कॉलेजच्या तृतीय वर्ष डिप्लोमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सफाई अधिक सुलभ करण्यासाठी ट्रायसायकलची निर्मिती केली आहे. ह्या सायकलचे वैशिष्ठ असे की ही ट्रायसायकल आकाराने छोटी असल्याने ती अरूंद रस्त्यावरूनही सहज कचरा जमा करू शकते. पेंडल चालविल्यास फिरणार्‍या ड्रममध्ये कचरा चालक सहजपणे उचलू शकतो. त्यानंतर सायकलवर असलेल्या मोठ्या पेटीत तो कचरा टाकता येतो. त्यासाठी सहकार्याची गरज लागत नाही. ध्वनी प्रदुषणमुक्त हे वाहन नाशिकच्या स्वच्छतेसाठी निश्‍चितच गती देणारे आहे. या वाहनात एका वेळी 30 ते 40 किलो कचरा सहज उचलता येऊ शकतो.
नाशिककरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शहर स्वच्छता हा कायमच महत्त्वाचा विषय राहिला आहे. नागरीकांनी आपल्या वस्तीत, कॉलनीत स्वयंप्रेरणेने कचरा निर्मुलनासाठी हातभार लावावा त्यामुळे आरोग्य चांगले राहिल. स्वच्छतेसाठी या तरूणांनी केलेले संशोधन अनेकांना प्रेरणा देणारे आहे व तरूण पिढीला ‘आपलं नाशिक’ विषयीचा जिव्हाळाही व्यक्त होतो.

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 9 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
पर्यावरणाची चळवळ व नाशिक


नाशिक शहराचा वाढता विस्तार बघता विविध विकासकामे वेगाने होत आहेत. त्यात रस्ता बांधणी हा एक लागवड ही सातत्याने होत असते. यात रस्त्यात असलेल्या चेंबरची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरुन चेंबरचे नुकसान होणार नाही व जिवीतहानी होणार नाही.
हरीत नाशिकच्या विकासासाठी झाडे लावणे, वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. जिथ पडीत जागा व रस्त्याच्या बाजूला जागा आहे. तेथे वृक्ष लागवडीसाठी आवाहन करावे जेणेकरुन प्रबोधनपर जाणिवेतून हे काम होईल. काही दिवसांपूर्वी वनविभागाने हरीत सेनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे अभियान सुरु केले आहे. त्यात ‘ग्रीन आर्मी’ अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी व ‘वृक्ष आपल्या दारी’ हे उपक्रम हाती घेतले त्यात अनेकांनी सहभाग नोंदविला आहे. पर्यावरणाशी नाते जोडण्याचा अनोखा प्रयत्न यातून झाला आहे. देवराई, म्हसरूळ परिसरात टेकडीवर हिरवळ फुलवली आहे, हेच या चळवळीचे यश आहे. शाळा महाविद्यालयीन पातळीवर जागतिक पर्यावरण दिन, ओझोन दिनाचे कार्यक्रम सादर होतात व त्यातून सकारात्मक संदेश पोहोचत असतो. शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त नाशिक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. कुठलीही चळवळ ही सर्वसामान्यांपासून सुरु होते व तिथूनच दिशा मिळत असते.

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 5 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
नाशिकच्या वाहतुक सुव्यवस्थेसाठी

नाशिकची वाढती लोकसंख्या व वाहनांचे वाढते प्रमाण यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने ‘अर्बन मोबिलीटी सेल’ची निर्मिती केली आहे. यामुळे पादचारी, विनावाहन प्रवास करणारे आणि सायकलचा वापर करणारे नागरिक यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम योग्य तर्‍हेने पाळण्यासाठी यातून मार्गदर्शन मिळणार आहे. यात शासकीय विभागांबरोबरच वाहतुकीच्या शिस्तीसाठी कार्यरत असणार्‍या विविध सामाजिक संस्था यात सहभागी होत आहेत.
नाशिक शहरात आजकाल वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाय सुचवण्यात येणार असून, त्यात पार्कींग सुविधा, झेब्रा क्रॉसिंग, वाहतुक बेट, गतिरोधक आदीविषयी विचार होईल. खरं तर यात नागरिकांनी स्वयंशिस्तीने पुढे येऊन या लोकचळवळीत योगदान दिले पाहिजे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक व्यवस्था यावरही विचारमंथन होण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी कृतीशील विचार गरजेचे आहे. शहराची वाहतुक सुव्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी अशा प्रयोगशीलतेतून वाहतुकीचे नवे उपाय समोर येतील व ते उपयुक्त ठरतील...!

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 2 May 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘गोदावरीच्या संवर्धनासाठी लोकजागर’
खळखळ वाहणारी गोदामाई आजूबाजूला हिरव्यागार झाडांचे नंदनवन असे दृश्य आज आपल्याला दिसत नाही. गोदावरीच्या पुन:सौंदर्यासाठी मोठी चळवळ उभी राहिली आहे. ती पुरेशी आहे का? याचे उत्तर सहसा नकारात्मकच येते. म्हणूनच नाशिकमधील ‘नमामि गोदा’ सामाजिक संस्थेतर्फे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज शासकीय पातळीवरून गोदा स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. परंतू यात खर्‍या अर्थाने लोकसहभाग महत्त्वाचा आहे. असा विचार या कार्यक्रमात मांडला गेला. जेव्हा नागरीक ठरवतील की गोदावरी आम्ही अस्वच्छ करणार नाही. तेव्हाच गोदावरी प्रदुषणमुक्त होईल. त्यासाठी विविध सामाजिक संस्था याकामी पुढाकार घेत आहेत. तसेच युवा पिढी यासाठी योगदान देत असून त्यांनाही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
‘नमामि संस्थेच्या’ या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असे की यात गोदावरी संवर्धनासाठी काम करीत असलेल्या संस्थांचा ‘गोदासेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशा सन्मानातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. नमामितर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यांनी गोदावरी संवर्धन वारीचे आयोजन केले आहे. त्यातून गोदावरी नदी किनारी असलेल्या वस्त्या आणि गावांमध्ये जाऊन गोदावरी प्रदुषणासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.’

नाशिक शहराचे वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यटकांचा धार्मिक कार्याच्या निमित्ताने होणारा कचरा रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी लोकजागर करणे महत्त्वाचे आहे. त्यातून गोदेचे सौंदर्य वाढेल व संवर्धन होईल.



विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur